भारताच्या सुरक्षेवर चीनचा सायबर हल्ला, India`s top secrets are in Guangdong

भारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला

भारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला
www.24taas.com, नवी दिल्ली

भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय. चोरलेल्या माहितीत क्षेपणास्त्र प्रणाली आणि रडार प्रोग्रॅमिंगशी संबधित माहिती असल्याचं सांगण्यात येतंय. ‘डीएनए’ या वृत्तपत्रानं हा खुलासा केलाय.

चीनच्या काही हॅकर्सनी ‘डीआरडीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ई-मेल आयडी हॅक केले. त्यानंतर त्यांनी संवेदनशील माहितीची चोरली. या ईलमेलवर जी माहिती येत होती ती काही सेकंदातच चीनी सर्व्हरपर्यंतही पोहचत होती. चोरलेल्या सर्व फाईल्स चीनच्या गुआंगडोन प्रांतातल्या सर्व्हरवर अपलोड करण्यात आल्यात. हा सायबर हल्ला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलाय.

डीएनएनं दिलेल्या माहितीनुसार चीन हॅकर्सनं डीआरडीओच्या अनेक कम्प्युटर्स हॅक करून मिसाईल संबंधित कार्यक्रमांची महत्त्वाची माहिती चोरलीय. तसंच हॅकर्सनं कॅबिनेट समितीच्या सुरक्षा संदर्भातील अनेक फायली उडवल्यात. सरकारच्या ‘नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’नं (NTRO) प्रायव्हेट सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसोबत या सायबर हल्ल्याचा तपास लावलाय. चौकशी दरम्यान, या हॅकर्सनं अमेरिका, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांचीही महत्त्वाच्या माहितींवर डल्ला मारलाय.

दरम्यान, या सायबर हल्ल्यात चीनच्या हॅकर्सच्या हातात कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती हाती लागली नसल्याचा खुलासा डीआरडीओचे प्रवक्ते रवि गुप्ता यांनी केलाय. डीआरडीओचे सर्व कम्प्युटर्स सुरक्षित असून कोणतीही माहिती लिक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

First Published: Wednesday, March 13, 2013, 12:32


comments powered by Disqus