Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:20
www.24taas.com, मुंबई 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. मुंबई निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला टार्गेट केलं. शिवसेना संपणार या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील समाचार घेतला आहे.
त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाचं अस्तिव संपणार हे मात्र लवकरच कळून येईल.या निवडणुकीनंतर शिवसेनेचं अस्तित्व संपेल या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनेक पिढ्या खाली आल्या तरी शिवसेनेला संपवणं शक्य नाही. जे इंदिरा गांधींना जमलं नाही ते पृथ्वीराज चव्हाण काय करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
First Published: Thursday, February 9, 2012, 17:20