Last Updated: Tuesday, June 19, 2012, 18:09
www.24taas.com, मुंबई मान्सून गेला कुठे असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रविवारी वन-डे खेळून मान्सून गायब झालाय. चीनमधल्या वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं बोललं जातंय.
चीनमधल्या तलीम वादळाने तिकडे मोठा पूरही आला होता. या वादळानं मान्सूनला अडथळा निर्माण केल्याचं म्हटलं जातंय. तर हवामानातील बदलामुळे मान्सून कमजोर झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.
काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रीय होईल असं हवामान खातं म्हणतंय. पण सध्या तरी मान्सून गायब झाल्यानं मुंबईकर हैराण आहेत. तर जिकडे पाऊस झाला नाही तिथले शेतकरीही चिंतेत आहेत.
First Published: Tuesday, June 19, 2012, 18:09