ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती Pressure on farmers for lands

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती
अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

कर्जबाजारीपणा आणि नापिकी यामुळं राज्यातला शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच दुष्काळामुळं शेतक-यांवर आस्मानी संकट कोसळलंय. हे कमी होतं की काय म्हणून आता पवनऊर्जा कंपनीकडून होणा-या फसवणूकीमुळं बळीराजा हैराण झाला आहे. सुझलॉन कंपनीकडून झालेल्या फसवणुकीमुळं सांगलीतल्या शेतक-यानं पवनचक्की टॉवरवर गळफास लावून आत्महत्या केली होती. आता असाच काहीसा प्रकार अहमदनगरमधल्या गर्भगिरी परिसरात घडला आहे. इनरकॉन कंपनीने इथल्या शेतक-यांच्या शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र कंपनी कर्मचारी आणि एजंटकडून जमिनी बळजबरीने घेत फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आता शेतक-यांक़डून होत आहे.



इनरकॉन कंपनी शेतक-यांवर दबाव टाकण्यासाठी गुंडाद्वारे धमकावत असल्याचा आरोपही होतोय... शिवाय पोलीसही कंपनीच्या दबावाखाली काम करत असल्याचं शेतक-यांनी म्हटलंय. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिलाय...तर पोलिसांनी मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय. अशा फसवणुकीमुळं दाद मागावी कुणाकडं असा प्रश्न चोहीबाजूंनी संकटांनी घेरलेल्या बळीराजापुढं उभा ठाकलाय...

First Published: Sunday, March 10, 2013, 19:11


comments powered by Disqus