लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट? - Marathi News 24taas.com

लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?

www.24taas.com, मुंबई
 
लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १०  बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.
 
लवासासाठी सगळे नियम डावलून जमीन दिली गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. जलसंपदा विभागाची जमीन ही सार्वजनिक हिताच्या कामासाठी देण्याचे निर्देश होते.
 
मात्र, असं असतानाही केंद्रानं लवासाला पंचतारांकित जमीन दिल्याचा फ़डणवीस यांनी आरोप केला आहे. जलसंपदा विभागाच्या अनागोंदी कारभारावरही फ़डणवीस यानी टीका केली आहे. फडणवीस यांच्या आरोपामुळे लवासा हे पुन्हा एकदा अडचणीत आल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 20:26


comments powered by Disqus