www.24taas.com, मुंबई
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.
ऑक्टोबर २००९ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. डिसेंबर २००९ आणि मार्च २०१० अधिवेशन झाले. या अधिवेशनात विरोधी पक्षाने हिरानंदानीचा विषय काढला होता. आगरी पाड्याच्या शिवालीचा विषय काढला होता. नाना चौकातील श्रीपती टॉवरचा विषय काढला होता. त्यानंतर पुण्याला टेकड्या बघायला गेले होते. येरवड्याचा विषय काढला होता. या सर्व विषयांचे झाले काय? त्याचा लेखाजोखा त्यांनी सभागृहाला द्यावा, अशी मागणी बाळा नांदगावकरांना आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली. त्यामुळे विरोध आणि सत्ताधारी नाही, तर विरोधकांमध्ये जुंपल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
या सर्व प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा, त्यानंतर राज ठाकरे या सर्वावर उत्तर देतील असे, बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी १० मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली होती. ते म्हणाले, एकनाथ खडसे, मनसे आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
राज ठाकरे कशाप्रकारे पाठित खंजीर खुपसतात हे आता भाजपला कळलं असेल अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. शिवाय सेटलमेंटचे आरोप करुन राज ठाकरे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी केला आहे. आधी भाजप मनसे यांचे एकमेकांशी फार गोड संबंध होते. भाजपला याबद्दल आम्ही सावधानही केलं होतं. आता भाजपला या गोष्टीचा अनुभव आला असेल, असं सुभाष देसाई म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये मनसेसोबत असलेली युती भाजप तोडण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात भाजपने बैठक बोलवली आहे.
www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी १० मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली होती. ते म्हणाले, एकनाथ खडसे, मनसे आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी १० मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली होती. ते म्हणाले, एकनाथ खडसे, मनसे आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
www.24taas.com, मुंबई
विधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
युपीएससी परीक्षांमधून मराठी आणि इतर प्रादेशिक भाषा डावलण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यामुळे ग्रामिण भागातून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, असं मत राज ठाकरेंनी मांडलं. तसंच यावेळी इतर भाषांना डावलल्यावर हिंदी भाषेला का वगळलं नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही. ती ही राज्यभाषाच आहे, हे दाखवणारे सरकारी पुरावे या वेळी राज ठाकरेंनी सादर केले. तसंच पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदीइतक्याच इतर प्रादेशिक भाषाही राष्ट्रभाषा असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं.
हा विषय केंद्रातला असल्यामुळे युपीएससी परीक्षा प्रकरणी महाराष्ट्राच्या ४८ खासदारांनी अधिवेशनात हा विषय उचलून धरावा, अशी विनंती राज ठाकरेंनी केली. त्यांचं नशिब चांगलं म्हणून युपीएससीचं ऑफिस महाराष्ट्रात नाही. असंही इशाऱ्यात राज ठाकरेंनी म्हटलं.
रतन टाटांसोबत झालेली भेट ही राजकीय दृष्टिकोनातून नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. रतन टाटांसारख्या व्यक्तींची भेट हा मला मिळालेला आशिर्वाद असल्याचं मी समजतो, असं राज ठाकरे म्हणाले. रतन टाटांशी दुष्काळ तसंच महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ताडोबा जंगलात वाघ वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. टाटांनी ताडोबामध्ये रिसॉर्ट्स सुरू करावीत, तसंच कोकण किनारपट्टीवरही व्यापार वाढेल आणि विकास कसा होईल याबद्दल बोलणी झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. एकनाथ खडसे मनसे मदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
www.24taas.com,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर मनसेच्या आमदारांची बैठक झाली. ही बैठक जवळपास पाच तास चालली. या बैठकीत सरकारला आक्रमकपणे विरोध करण्याची रणनीती आखण्यात आलीय. तसचं आपलं वेगळं अस्तीत्व दाखविण्यासाठी मनसे करील, अशीही चर्चा झाली. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसे सरकारला कोणत्या मुद्द्यावरून धारेवर धरणार, याचीच उत्सुकता आहे.
अर्थसंकल्प अधिवेशनावर आपला वेगळा ठसा दाखवण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. प्रथमच अधिवेशनात मनसे आपली वेगळं चूल मांडणार आहे. भाजप-शिवसेना यांच्या सोबत विरोध न करता वेगळी रणनीती मनसे अवलंबणार असल्याचे समजते. त्यासाठी राज यांनी ही बैठक बोलाविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बैठकीत नेमका काय निर्णय झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.
मनसे हा पक्ष स्थापन होऊन आज तब्बल सात वर्ष पूर्ण झालीत. याच निमित्तानं पक्षाच्यावतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना सावध करताना, राजकारणात काम करताना अजिबात बेसावध राहून चालणार नाही असा उपदेश केलाय. यावेळी मुंबईतील मतदारांची नावं वगळण्यात आलेली एका यादीचं वाचनही राज ठाकरेंनी यावेळी करून दाखवलं.
‘जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी मुंबई उपनगरात वगळण्यात आलेल्या मतदारांची नावं जाहीर केलीत. कुणालाही न सांगता मतदार यादीतून मराठी लोकांची नावं वगळण्यात आलीत. जी माणसं वगळली गेलीत त्यांची नावंही माझ्याकडे आहे, त्यातली ८५ टक्के लोक मराठी आहेत. मनसेची लोक निवडून येऊ नये म्हणून या प्रकारचं नवं षडयंत्र उभारण्यात आलंय. अचानक एवढी माणसं मुंबई सोडून कशी गेली??? सगळ्यांना स्थलांतरीत म्हणून दाखवण्यात आलंय’ असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय.
वगळलेल्या लोकांची नावांची एक यादीच मनसेनं तयार केलीय. आमदार, विभाग अध्यक्ष यांनी सोमवारी मनसेच्या ‘राजगड’ या कार्यालयावरून घेऊन जाण्याची आणि त्यावर काम करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी केलीय.
www.24taas.com,मुंबई
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
मनसेचा आज सातवा स्थापना दिन आहे. या स्थापना दिनाच्या वर्धापन दिनात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यावेळी हा ठाम विश्वास व्यक्त केला. जे काही चाललं आहे ते तुमच्यामुळे सर्व चाललं आहे. माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच. मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत.
भाषणातील ठळक मुद्दे
मतदार यादीतून परस्पर मराठी नावं वगळली
मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप
महायुतीत मनसे सहभागी होण्याची शक्यता लावली फेटाळून
काल पुन्हा टाळी आली, मी टाटा केलं | विशालची उडवली खिल्ली |
महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार आणि तीही स्वबळावरच
रतन टाटा भेटीचा मी शुभसंकेत समजतो
रतन टाटा मनसे वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला भेटायला आले... हा तुमचाच बहुमान
मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो
माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच
तुमच्यामुळे सर्व चाललं आहे
www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे वर्धापनदिनानिमित्त त्यांची भुमिका स्पष्ट केली. पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंना काय वाटतं याबाबत त्यांचे मतही जाहीर केले. ‘मी कधीकधी रात्री असा दचकून उठतो, आणि फक्त एका विचाराने एका कल्पनेने दचकून उठतो, की पक्ष स्थापन केला ९ मार्चला आणि १९ मार्चला शिवतीर्थावर सभा आहे मी सांगितलं.’
‘समजा, लोकं नसती आली तर, नुसत्या या कल्पनेनेच भीती वाटते. आणि ते जे काही घडलं, जे काही घडतयं, जे काही घडत जातय... लोकं मला विचारतात, तुमच्यात एवढी हिंमत येते कुठून? ही तुमच्यामुळे येते. जे काही चालू आहे. माझ्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे...’
`मुंबई, ठाणे आणि नाशिक पुरता मर्यादित बोलणारे आता तोंडात बोट घातलं आहे...’ असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेने अल्पवधी काळात जी वाटचाल केली आहे त्याचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे.
www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेला जोरदार टोला हाणला. काल सकाळी वर्तमानपत्रातून पुन्हा एक `टाळी` आली, मग मी दुपारी `टाटा` केला.
मनसेचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. शिवसेनेचे नाव न घेता युतीबाबत राज ठाकरे यांनी ‘टाटा’ केला. या लोकांना काही दुसरा उद्योग आहे की नाही?... जरा आत्मपरीक्षण करा, सारखे कसले खिडकीतून डोळे मारताय?, असा चिमटा राज यांनी शिवसेनेला काढला. राज्यात महायुतीची `विशालयुती` होण्याबाबतच्या चर्चेला उधाण आलं होतं.
शिवसेना-भाजप-रिपाईला मनसेचं इंजिन जोडलं जाणार, असं वृत्त राजकीय वर्तुळात पसरलं होतं. त्यामुळे या नव्या समीकरणाबाबत राज आज काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच कान लागले होते. ही उत्सुकता लक्षात घेऊन आणि कुठल्याही शंकेला वाव राहू नये, या उद्देशानं राज यांनी हा विषय पुन्हा आपल्या `स्टाइल`नं निकाली फेटाळला. उद्योगपती रतन टाटा भेटायला आले, हे तुमचं यश आहे, अशी कौतुकाची थाप राज यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिवर मारली. जे काही चाललं आहे ते तुमच्यामुळे सर्व चाललं आहे. माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच. मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत.
गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी `सामना`मधून राज यांच्याकडे `टाळी` मागितली होती. पण, कोल्हापूरच्या सभेत राज यांनी त्यांना `टाळी`ऐवजी टोला लगावला होता. तिच भूमिका त्यांनी आजही कायम ठेवत टाळीला टाटा केला. महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणणार म्हणजे आणणारच आणि तीही स्वबळावरच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे जे काही (विशालयुती) बोललं जातंय, त्या गोष्टी खरंच घडताहेत का हे मला तरी माहिती नाही, असं म्हणून त्यांनी या चर्चा बोगस ठरवल्या आणि `विशालयुती`च्या विषयावर पडदा टाकला. मात्र, सत्ता हवी असेल तर कार्यकर्त्यांनी जागते राहिले पाहिजे, असा गंभीर इशारा राज यांनी यावेळी दिला.