समान विकासाची गरज
आज आपण भारताचा ६७वा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय. पण भारतासमोर अनेक आर्थिक आव्हानं आहेत. त्यातलंच एक म्हणजे भारताला समान विकासाची गरज आहे. एकीकडे शहरं वाढतायेत तर दुसरीकडे गावांची हवी तशी प्रगती होत नाहीय.
गरिबीचं संकट कायम
भारतासमोरचं मोठं संकट म्हणजे गरिबी. देशात गरिबी आणि श्रीमंती यातली दरी वाढत चाललीय.
बेरोजगारीची समस्या
देशात सध्या तरुणांचं प्रमाण जास्त आहे. मात्र त्यांना रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं बेरोजगारीची कुऱ्हाड तरुणांवर लटकतेय.
असमान विकास
भारतासमोरचं महत्त्वाचं संकट म्हणजे शहरं आणि गावांचा होत असलेला असमान विकास.
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक
भारताची आर्थिक प्रगती होण्यासाठी देशात परदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआय आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद अजून मिळाला नाहीय.
व्यापारातील तूट कमी करणं
व्यापारातील तूट भरून काढण्याचं आव्हान. भारताच्या ८० देशांसोबतच्या व्यापारात कमतरता आलीय.
कर सुधारणा
वस्तू आणि सेवा कर (GST) आणि प्रत्यक्ष कर कोड (DTC) मुळं आर्थिक वाढ पुन्हा चालू करण्यास मदत मिळेल.
पायाभूत सुविधांमध्ये वाढ
आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.
/marathi/slideshow/भारतासमोरील-आर्थिक-आव्हानं_253.html/3