राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 20:09

२४ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातलं तिसरा टप्प्यातलं मतदान होत आहे. यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकणातली एक जागा आणि ठाणे जिल्ह्यातल्या एकूण १९ जागांवर २४ तारखेला मतदान होणार आहे. एकूण 338 उमेदवारांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होणार आहे.