Last Updated: Sunday, December 9, 2012, 12:36
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. बाबा-दादा यांना धारेवर धरण्याची व्युहरचना केली आहे. त्यासाठी सिंचन घोटाळाचा प्रश्न उचलून धरण्यात येणार आहे.