नगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 09:23

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. शाळेत गळा आवळून गावातील एका झाडाला तरुणाला लटकवल्याचा धक्कादाय प्रकार उघड झाला. या हत्या प्रकरणी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.