Last Updated: Friday, December 20, 2013, 22:15
आदर्श अहवालावरून विरोधक आक्रमक झालेत. राज्य सरकारने आदर्श अहवालाबाबत घेतलेल्या चालढकल भूमिकेनंतर विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे. सरकारनं मांडलेला आदर्श अहवाल फाडून विरोधकांनी सरकारचा निषेध केला. नागपूरला विधानभवनाच्या आवारातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अहवालाचे तुकडे केले.