अफगाणिस्तानमध्ये मोठे भूस्खलन, 350 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 14:54

अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

माळशेज घाटातील वाहतूक बंदच

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:36

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू

Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:02

कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.

दरड कोसळल्याने माळशेज घाट बंद

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:47

माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.

वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?

Last Updated: Thursday, July 11, 2013, 17:57

वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.

पाऊस ओसरला, पण चाकरमान्यांचे हाल सुरूच

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:02

मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय.

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, August 4, 2012, 16:56

बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.

लेहमध्ये भूस्खलन, ४०० पर्यटक फसले

Last Updated: Saturday, June 9, 2012, 15:23

श्रीनगरमधील 'खारदुंग ला'तील लेह-नुब्रा व्हॅलीच्या मार्गावर १० किलोमीटरचे क्षेत्र भूस्खलनामुळे धोक्यात आले आहे. भूस्खलनामुळे १५० वाहनांसह ४०० लोक फसले गेले आहेत. फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.