चंद्रपूर जिह्यात संकट, कोरपना हादरला

Last Updated: Saturday, September 21, 2013, 11:20

आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतही समस्या कुपोषणाची!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:29

आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.

ठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:32

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.

भंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 21:05

प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे

Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:56

कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय. मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय. नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे. साडेचार वर्षाच्या नंदिनीचं वजन आहे फक्त नऊ किलो...

रत्नागिरीत कुपोषणाचे १५२ बालकं बळी

Last Updated: Friday, October 12, 2012, 20:49

रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 152 बालकं कुपोषणानं दगावल्याचं समोर आलंय.

मध्यमवर्गीय तरुणींना फिगरचीच काळजी - मोदी

Last Updated: Thursday, August 30, 2012, 13:31

मध्यमवर्गीय आपल्या आरोग्यापेक्षा सौंदर्याक़डे आणि फिगरक़डे जास्त लक्ष देऊ लागले असल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

आमिर खान करणार विनामोबदला जनजागृती

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 07:42

टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.