Last Updated: Monday, January 16, 2012, 18:29
वॉर्डवाटपावरुन मुंबईत आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत. मुंबईत आघाडी होऊन आठवडा उलटत आला तरी, अजूनही वॉर्डवाटपाचा घोळ कायम आहे. वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादीला जागा हव्या आहेत, तर हक्काच्या जागा सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. यातत काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये असल्याचं समजत.