Last Updated: Friday, September 6, 2013, 15:51
राज्यात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा होण्याची चिन्ह आहेत. राज्य सरकार पुढील अधिवेशनात आठवीपर्यंतच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात यासंदर्भात प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून पुढे केंद्राकडे पाठवण्यात येणारेय. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.