Last Updated: Thursday, February 6, 2014, 22:05
कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.