Last Updated: Wednesday, March 21, 2012, 10:14
औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे.