Last Updated: Thursday, July 12, 2012, 22:08
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी उभालेल्या कोल वॉशरी बंद केल्यानं कामगारांवर आत्महत्येची पाळी आलीय. अनेक कामगारांनी जमिनीच्या बदल्यात नोकरी दिली गेली असल्यानं, त्यांच्याकडे रोजगाराचा दुसरा पर्यायही राहिलेला नाही. वॉशरिजमध्ये कोळसा धुतला जात नसल्यानं महाजेनकोनं घेतलेला निर्णय कामगारांच्या मुळावर आलाय.