Last Updated: Monday, July 23, 2012, 14:40
राज्यातल्या आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु असताना समन्वय समितीच्या बैठकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असमन्वय निर्माण झालाय. राष्ट्रवादीला समन्वय समितीच्या बैठकीबाबतचे पत्र देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे. तर बैठकीच्या पत्राबाबतचा काँग्रेसचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय.