Last Updated: Wednesday, September 12, 2012, 10:46
गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरूवात केली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेऊन धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले. आज महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.