बेस्ट बेकरी प्रकरणात चौघांना जन्मठेप

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:53

गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या नृशंस दंगलीदरम्यानच्या बेस्ट बेकरी हत्याकांडाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच जणांची सोमवारी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. मात्र या प्रकरणातील चार जणांना दोषी ठरवत त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.