शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:00

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

शहीद कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:23

पाकिसतान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय. काल विशेष विमानानं मानेंचं पार्थीव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर पहाटे पार्थीव कोल्हापूरातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झालं. आणि तिथून त्यांना पिंपळगावकडे रवाना करण्यात आलं.

शहीद कुंडलिक मानेंची इच्छा अपूर्ण...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:49

भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलीक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.

पाकिस्तान हल्ला, संसदेत पडसाद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:14

पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.

पाच वर्षांच्या मुलानं दिला शहीद हेमराजला मुखाग्नि!

Last Updated: Thursday, January 10, 2013, 09:46

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय जवानाचे शिर कापून पाकिस्तानी सैनिकांनी नेले

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 11:23

पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य काल पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.