Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:14
पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.