Last Updated: Thursday, August 29, 2013, 11:25
रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.