रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Saturday, January 11, 2014, 18:15

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

रणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:38

मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.

२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 13:29

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.

वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं

Last Updated: Monday, January 7, 2013, 06:52

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलंय.