राज्यात कमी मतदान, सत्ताधाऱ्यांना दिलासा?

Last Updated: Thursday, February 16, 2012, 19:55

राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी शांततेत मतदान झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत दिवसाच्या शेवटी ४५ टक्क्यांच्या आतच मतदान झाल्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४६ टक्के मतदान झालं होतं. यावेळी मतदारांनी फारसा उत्साह दाखवला नाही.