Last Updated: Friday, July 20, 2012, 18:27
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.