अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार

Last Updated: Sunday, April 27, 2014, 09:12

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.

आता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले

Last Updated: Thursday, January 23, 2014, 15:34

सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे. आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्‍चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.

नोकरीची संधी: महावितरणमध्ये २००० पदांची भरती

Last Updated: Thursday, January 9, 2014, 10:55

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:19

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 10:48

चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

फिरतं ‘एटीएम’ करणार ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती!

Last Updated: Monday, June 24, 2013, 12:09

ग्रामीण भागात अजूनही उपलब्ध नसलेली एटीएमची सुविधा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीचा गंभीर प्रश्न यांचा ताळमेळ घालत सरकारनं ग्रामीण भागात ‘मायक्रो एटीएम’ ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबाद मनपात स्वर्ण रोजगार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा?

Last Updated: Monday, May 27, 2013, 22:30

बोगस कर्जप्रकरणं मंजूर करून अपात्र लोकांना कोट्यवधींच्या कर्जाचं वाटप... कर्जप्रकरणाचे 11 वर्षातील माहितीचे रेकॉर्ड महापालिकेतून गायब

सौदीत `निताकत`... ६० लाख भारतीय बेरोजगार!

Last Updated: Friday, May 24, 2013, 18:01

सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय.

`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:55

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.

सरकारी रोजगार केंद्रांनाच घरघर!

Last Updated: Monday, May 6, 2013, 17:48

सुशिक्षित बरोजगारांना नोकरी मिळावी, त्यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करता यावं म्हणून राज्य सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्र स्थापन करण्यात आलंय. मात्र सध्याच्या स्पर्धेच्या युगात आता या रोजगार केंद्रांना घरघर लागलीय.

बेरोजगारीत होणार वाढ

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:21

२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं ‘आंतरराष्ट्रीय श्रम संगठन’नं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 19:06

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.