Last Updated: Monday, March 10, 2014, 11:13
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी हे तीन उमेदवार काँग्रेसनं निश्चित केलेत. या निवडणुकीसाठी अर्जभरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काँग्रेसनं ही यादी निश्चित केलीय. या यादीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची छाप आहे. संख्याबळाचा विचार करता हे तिन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.