Last Updated: Sunday, January 26, 2014, 08:36
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...