Last Updated: Tuesday, May 21, 2013, 19:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआयपीएलच्या सहाव्या सीझनच्या प्ले-ऑफच्या मॅचेस होणारच असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिला. यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.
काही लोकांमुळे आयपीएलवर बंदी आणू शकत नाही असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टानं 15 दिवसात भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थातच बीसीसीआयकडून अहवाल मागितला आहे.
त्याचप्रमाणे दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही बीसीसीआयला देण्यात आले आहेत. दरम्यान, प्ले-ऑफच्या मॅचेसवर बंदी आणावी अशी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 19:03