दक्षिण सुदानमधील हल्ल्यात तीन भारतीय जवानांचा मृत्यू

Last Updated: Friday, December 20, 2013, 21:52

दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.

शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री अनुपस्थित

Last Updated: Friday, August 9, 2013, 08:00

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही मानेंच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण सुरू झालंय.शहीद कुंडलीक माने यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित होते. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.

शहीद कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये

Last Updated: Thursday, August 8, 2013, 09:23

पाकिसतान सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावमध्ये दाखल झालंय. काल विशेष विमानानं मानेंचं पार्थीव दिल्लीहून पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर पहाटे पार्थीव कोल्हापूरातील मराठा लाईट इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झालं. आणि तिथून त्यांना पिंपळगावकडे रवाना करण्यात आलं.

शहीद कुंडलिक मानेंची इच्छा अपूर्ण...

Last Updated: Thursday, August 8, 2013, 13:49

भारतीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्हयातील पिंपळगांव बुद्रुक इथले जवान कुंडलीक माने शहीद झाले. या घटनेमुळं पिंपळगावसह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरलीय. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कुंडलीक हे निवृत्तीनंतर गावातील मुलांसाठी बसची सोय करणार होते. पण त्यांची ही इच्छा अपूरीच राहिली.

पाकिस्तान हल्ला, संसदेत पडसाद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 14:14

पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.

जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, ५ जवान शहीद

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:18

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 17:23

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

हिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी

Last Updated: Friday, January 11, 2013, 23:55

‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय सैनिक शहीद

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 23:29

पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन पेट्रोलिंग करणा-या भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. तर दोन सैनिक जखमी झाले आहेत.

फाटकेबूट घालून सिमेवर जवानांचा पाहारा

Last Updated: Thursday, September 27, 2012, 10:09

केंद्रातील यूपीए सरकारचा टू-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा देशभर गाजत असतानाच भारतीय लष्कराचे जवान फाटके बूट घालून सिमेवर पाहारा देत आहेत. लढण्यासाठी जवानांसाठी अत्याधुनिक बूट घेण्यास केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.