Last Updated: Friday, October 18, 2013, 10:38
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चितळे समिती नेमलीय .मात्र या चौकशी समितीचा काही उपयोग होईल का, याबाबत साशंकताच आहे. कारण राज्याच्या स्थापनेपासून आजतागायत विविध घोटाळ्यांची आणि महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तब्बल ६० चौकशी आयोग स्थापन करण्यात आले होते. मात्र या आयोगांच्या अहवालावर सरकारनं कोणतीही कारवाई केली नसल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय.