कोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश

Last Updated: Friday, February 28, 2014, 08:19

कोल्हापुरात टोलवसुली थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयआरबी कंपनीला ही मोठी चपराक असल्याचं मानलं जातंय.

कोल्हापुरात टोल वसुली सुरूच राहणार, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Last Updated: Monday, October 21, 2013, 14:22

कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीला हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. आता यासंदर्भातली सुनावणी २८ ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणारेय. त्यामुळं शहरात टोल वसुली सुरूच राहणार.

टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

Last Updated: Friday, October 18, 2013, 08:10

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:01

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 14:17

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.

राज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’

Last Updated: Saturday, June 29, 2013, 08:29

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.