ठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:28

राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.

सून बनवण्याचं आश्वासन देऊन मंत्र्यांनी केलं लैंगिक शोषण!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:15

नेते मंडळी जनतेला आश्वसनं देऊन फसवत असल्याचं नेहमीच दिसून आलं आहे. मात्र जेडी(एस)च्या एका आमदरांनी हद्दच गाठली. एका मुलीला सून बनवून घेण्याचं आश्वासन देत तिचं दोन वर्षं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या आमदारांवर झाला आहे.

राहुल गांधींचे अडीच तासांत दुष्काळ पर्यटन!

Last Updated: Sunday, April 29, 2012, 09:34

महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी साता-यात आले. राहुल गांधींनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. फक्त अडीच तासांत युवराजांनी दौरा आटोपला. तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्य़था अवघ्या अडीच तासांत राहुल गांधींना कळल्या.

दुष्काळ : राहुल यांचे गुळगुळीत आश्वासन

Last Updated: Saturday, April 28, 2012, 13:49

सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.

सभागृहात केवळ आश्वासनांची खैरात

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:36

विधीमंडळाच्या सभागृहात आश्वासनांची खैरात वाटली जाते मात्र मंत्री त्या आश्वासनांची पूर्ताताच करत नाहीत विधीमंडळाच्या आश्वासन समितीनच हा खुलासा केला आहे.