Last Updated: Saturday, April 28, 2012, 13:49
सातारा दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी माण खटाव तालुक्यातल्या जासी गावाला भेट दिली. यावेळी जासी गावच्या सरपंच मिनाक्षी पवार यांनी राहुल गांधी यांच्यासमोर गावक-यांची व्यथा मांडली. तर आम्हाला पैसे नको, कायचं पुरेसं पाणी द्या...अशी व्यथा जासी गावच्या ग्रामस्थांनी राहुल गांधींसमोर मांडली. ग्रामस्थांना आश्वासन देताना राहुल म्हणाले, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. दुष्काळ भागातील प्रश्न सोडविण्यात येतील. मी दिल्लीत गेल्यावर याप्रश्नी लक्ष घालीन.