सरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले

Last Updated: Thursday, March 20, 2014, 16:42

खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 22:25

शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.

गारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले

Last Updated: Saturday, March 15, 2014, 16:12

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.

'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:27

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:44

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.

सलग चौथ्या दिवशीही राज्यात गारांचा कहर

Last Updated: Saturday, March 8, 2014, 22:37

महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट...

Last Updated: Thursday, March 6, 2014, 16:02

हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

नाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:47

राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.