Last Updated: Saturday, February 18, 2012, 20:28
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधा-यांना झटका बसलाय. तर काही ठिकाणी अनपेक्षित यश मिळालंय. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. तर सांगलीत पतंगराव कदमांबरोबरच्या लढतीत जयंत पाटलांनी बाजी मारली आहे. तर कोकणात ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्यातरी येथे त्रिशुंकू परिस्थिती आहे. रायगजमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली तरी सत्ता शेकाप-सेना-भाजप-आरपीआय महायुतीची असणार आहे.