सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

Last Updated: Thursday, March 13, 2014, 15:34

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.

हत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:12

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप मतांसाठी जातीय दंगली घडवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आपल्या आजी आणि बाबांची हत्या करण्यात आली त्यामुळं आपल्यालाही जिवंत ठेवणार नसल्याचं वक्तव्य केलं. मात्र आपण घाबरत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लालकृष्ण आडवाणींचा भाजपला घरचा आहेर

Last Updated: Sunday, March 10, 2013, 08:52

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. देशातील जनतेमध्ये भाजपच्या बाबतीत काहीसं अविश्वासाचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.