वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!

Last Updated: Friday, June 21, 2013, 08:33

मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.

उद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला

Last Updated: Friday, October 5, 2012, 16:59

अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

मंत्रालय आगीचे होणार 'सेफ्टी ऑडीट'

Last Updated: Sunday, June 24, 2012, 13:41

मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...

Last Updated: Friday, June 22, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे