आश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!

Last Updated: Sunday, April 13, 2014, 14:11

निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.

नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Last Updated: Saturday, February 8, 2014, 20:37

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला मोदीनी उत्तर दिलंय. मोदींनीही काँग्रेसचा समाचार घेतलाय. पटेल नसते तर आसाम पाकिस्तानात राहिले असते असं सांगत गुवाहाटीतल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

गोळी लागून अमरावतीच्या महिला जवानाचा मणिपूरमध्ये मृत्यू

Last Updated: Friday, November 22, 2013, 20:50

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची महिला सैनिक प्रीती बोळे हिचा गोळी लागून मृत्यू झाला. ती मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आपले कर्तव्य बजावत होती. प्रीती ही अमरावतीची आहे. दीड वर्षांपूर्वीच ती सीआयएसएफमध्ये रुजू झाली होती.

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 10:48

मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.

मेरी कोमचे नाव मणिपूरमधील रस्त्याला देणार

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 15:52

मणिपूर शासनाने चूडाचांदपूर जिल्ह्यातील एका रस्त्याला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एमसी मेरीकोम हिचे नाव दिले.

मणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 11:47

मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.

मणिपूरमध्ये ३० टक्के मतदान

Last Updated: Saturday, January 28, 2012, 15:21

मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.