आलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?

Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:39

कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.

विदर्भ-कोकणात पूर परिस्थिती

Last Updated: Friday, August 2, 2013, 20:57

चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.

उत्तराखंड : ५७४८ बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार?

Last Updated: Monday, July 15, 2013, 14:10

बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.

महापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 21:21

`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ८ ठार

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 18:58

केदारनाथ ते गौरीकुंड येथे बचाव कार्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे एम आय -१७ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या अपघातात पाच क्रू मेंबर आणि तीन इतर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती

Last Updated: Friday, June 21, 2013, 21:46

उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.

शत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख

Last Updated: Thursday, June 20, 2013, 19:41

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.