Last Updated: Saturday, June 7, 2014, 19:52
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.