Last Updated: Friday, April 13, 2012, 08:21
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा प्रकट झाल्याने भाविकांची गर्दी होवू लागली आहे. दर तीन वर्षांच्या अंतराने प्रकटणारी गंगा यावेळी अवघ्या दहा महिन्यातच पुन्हा आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान भूगर्भातील हालचालीमुळे ही गंगा प्रकट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल (दि.११ एप्रिल) ला इंडोनेशियात ८.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे ही गंगा अवतल्याचे काहींचे म्हणणे आहे.