Last Updated: Wednesday, July 3, 2013, 17:38
सध्या मोबाईलचा जमाना आहे. अनेकांकडे किमान दोन तरी मोबाईल दिसून येतात. त्याची कारणे वेगळी असतील. मात्र, यातील एक कारण कॉमन आहे. ते म्हणजे एका मोबाईलची बॅटरी उतरली तर! त्यासाठी काळजी म्हणून दुसरा मोबाईल उपयोगी पडतो. काहीजण दोन मोबाईल बॅटरी जवळ बाळगून असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, मोबाईलची बॅटरी फुल चार्ज केली तर तिचे आयुष्य कमी होते.