`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 20:50

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.

तेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच

Last Updated: Thursday, January 9, 2014, 16:10

आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.

आंध्रच्या विभाजन मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष

Last Updated: Saturday, October 5, 2013, 14:39

आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.

स्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:50

तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं. संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.