रुईयाचा 'नाका म्हणे'

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:40

रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे. कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत.

'सुखांशी भांडतो आम्ही' आता हिंदी आणि गुजराथीत!

Last Updated: Thursday, November 24, 2011, 12:50

चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं 'सुखांशी भांडतो आम्ही' हे नाटक आता लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेता मनोज जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.

राजीव पाटील वळले रंगभूमीकडे

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

जोगवा' आणि 'पांगिरा' या दोन्ही नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमांमधून आपली दखल घ्यायला लावली ती दिग्दर्शक राजीव पाटीलनं. सिनेमांमध्ये व्यस्त असलेला राजीव आता रंगभूमीवर 'प्रियांका आणि दोन चोर' हे नवं नवं नाटक घेऊन येतोय.

भीषण राजकीय नाट्य- 'वार-करी'

Last Updated: Friday, November 18, 2011, 11:54

राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारे सामाजिक आशयप्रधान ‘वार- करी’ हे नाटक बॉश फाईन आर्ट्सने सादर केले.

दिलीप प्रभावळकरांना गदिमा पुरस्कार जाहीर

Last Updated: Thursday, November 17, 2011, 16:20

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना अत्यंत मानाचा समजला जाणार ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालन सारंग यांना ‘गृहिणी सखी सचिव’ तर शिक्षणतज्ञ रावसाहेब कसबे यांना ‘स्नेहबंध’ आणि मोनिका गजेंद्रगडकर यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे आनंद माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुण्यात १४ डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

चैतन्याचा झरा म्हणजे पु.ल.

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 18:22

मराठी साहित्यातला चैतन्याचा झरा म्हणजे पुल. संगीतातला आनंद यात्री म्हणजे पुलं. रंगभूमीवरचा परफॉर्मर म्हणजे पुलं. पुलंनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप प्रत्येक ठिकाणी पाडली अर्थात ही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी पाडायला लावली.

रायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 15:51

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.

रत्नाकर मतकरींना विष्णुदास भावे गौरव पदक

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 15:30

यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. राम जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नगरलाच रंगणार राज्य नाट्य स्पर्धा

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 14:28

अहमदनगर इथेच ९ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धा रंगणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कमी प्रवेशिका प्राप्त झाल्याचे कारण देत नगरच्या राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रद्द केलं होतं.

‘रणांगण’ पुन्हा रंगभूमीवर!

Last Updated: Thursday, October 20, 2011, 09:26

पानिपत युद्धाचं यंदाचं २५०वं वर्ष आहे. या निमित्तानं पुण्यातल्या युवा रंगकर्मींनी रणांगण पुन्हा एकदा रंगमंचावर आणायचं ठरवलंय. दिग्पाल लांजेकर या नाट्यकमीर्नं ही धुरा उचलली असून नव्यानं रंगमंचावर येत असलेल्या 'रणांगण'चं तो दिग्दर्शन करतो आहे.