Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48
www.24taas.com, झी मीडिया, रायगडरायगड जिल्ह्यात दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. अपघातात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय. नागोठणे जवळ हा अपघात झाला आहे.
दिवा-रोहा या पॅसेंजर गाडीचे चार डबे रूळावरून घसरले आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत.
बोगीसह इंजीनही रूळावरून घसरलंय. कोकण रेल्वेची वाहतूकही यामुळे कोलमडली आहे, काही गाड्या ठप्प झाल्या आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 4, 2014, 11:37