Last Updated: Sunday, May 18, 2014, 20:30
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
पावसाचे प्रमाण जरी कमी झाले, तरी मुंबई ही देशातील जास्त पावसाच्या टप्प्यात येते. या कारणाने मुंबईत तासाला 60 मीमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. मुंबईने 26 जुलैचा पाऊस अनुभवला असल्याने मुंबईकरांना रस्त्यावर पाणी साठलेले पाहण्याचा अनुभव आहे.
सध्याच्या काळात मुंबईचा 75 ते 80 टक्के भाग हा सिमेंट आणि काँक्रिटीकरणाने व्यापलेला आहे. या कारणाने मुंबईच्या रस्त्यावरचे पाणी हे जमिनीत झीरपत नाही. यासाठी महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्यांवर भर दिला आहे. पण सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या कारणाने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याकारणाने हेच पाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या आधारे शहरात येण्याची भीती सध्या महापालिकेला वाटत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 18, 2014, 20:30