मुंबईसह कोकणात समुद्राला उधाण, भरतीचे पाणी रस्त्यावर

Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:37

मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गात भरतीचा तडाखा बसला.

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

वजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:33

तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.

नळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही

Last Updated: Monday, June 9, 2014, 21:47

आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.

कसं असेल गडकरींचं रस्ते विकास धोरण?

Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:35

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसात काय काम करणार आहात, याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे.

पाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार

Last Updated: Sunday, May 18, 2014, 20:30

मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

... तर नष्ट होईल पृथ्वी?

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 17:49

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

ठाण्यात झोपडीधारकांना बाटली बंद पाणीपुरवठा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:03

झोपडपट्टीतील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चक्क बाटली बंद पाणी देण्याचा विचार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने ही जबाबदारी खासगी कंपनीच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय केलाय.

ठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:07

यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.

व्हिडिओ : तिला खूप खूप रडायचंय पण...!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 11:22

ही कहाणी आहे एक मुलीची... आयुष्यात केवळ अपमान आणि धक्क्यांशिवाय तिला काहीच मिळालेलं नाही... खूप खूप मन भरून आलंय... पण, तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला असमर्थ ठरतात...

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

कडक उन्हात घ्या थंडपेयांचा आसरा!

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 07:51

गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!

Last Updated: Monday, May 5, 2014, 17:49

उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

मुंबईकरांनो पाणी काटकसरीनं वापरा

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:26

मुंबईकरांना यंदा पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे, कारण हवामान विभागाने यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं सांगितलं आहे.

पिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी

Last Updated: Sunday, April 27, 2014, 22:42

पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.

100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:54

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

एटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!

Last Updated: Monday, March 24, 2014, 12:45

आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.

मुंबईत बस धावणार समुद्रातून!

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 09:42

मुंबईत प्रवास करणे जिकरीचे होत आहे. वाहनांमध्ये होणारी वाढ आणि त्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना. त्यातच रस्ते खराब असल्यामुळे खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतो. यासर्वांमुळे तुम्हाला प्रवास नकोसा वाटतो. मात्र, हा प्रवास तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. कारण बसमधून प्रवास कराल तोही समुद्रातून. हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरलेले सत्य आहे.

सोनीचा नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन, २० मेगापिक्सल कॅमेरा

Last Updated: Sunday, February 23, 2014, 21:40

सोनी नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन वाटरप्रुफ आहे. क्सपीरिया झेड-१ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनचे फिचरही शानदार आहेत. हा फोन वाटरप्रुफ आहे. या फोनचा कॅमेराही शक्तीशाली आहे. त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये धूम करील, अशी कंपनीला आशा आहे.

गोदावरीत वीजेचा करंट सोडून जीवघेणी मासेमारी

Last Updated: Friday, February 21, 2014, 12:39

औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.

पाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 16:28

कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय.

मंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 18:35

मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.

सोनीचा `एक्स्पेरिया Z1s’ वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 12:53

आता वॉटरप्रूफ स्मार्टफोनचा जमाना आलाय. यातच भर टाकत सोनीनं नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘सोनी एक्स्पेरिया Z1s’ हा स्मार्टफोन साडेचार फूट पाण्यात तब्बल ३० मिनिटं राहू शकतो आणि त्याच्यावर पाण्याचा काहीच परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा सुद्धा आहे.

ग्लासभर पाण्याने काय होते...

Last Updated: Saturday, January 4, 2014, 13:48

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. पाणी किती प्यावे, कधी प्यावे आदी अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. पण घाबरू नका. तुमच्यासाठी या काही टिप्स...

फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:01

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

पाहा - कोयनेत पाण्याखाली अनोखा आविष्कार

Last Updated: Friday, January 3, 2014, 13:12

स्थापत्य अभियांत्रिकीचा अनोखा आविष्कार सध्या कोयनेच्या पाण्याखाली अनुभवायला मिळतोय. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीच काम सध्या सुरु आहे. कोयनेच्या टीमनं दाखवलेलं धाडस तसेच कौशल्यामुळ आपल्या राज्याचं सुमारे १६०० कोटींचं संभाव्य नुकसान टळलं आहे.

दिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट

Last Updated: Monday, December 30, 2013, 18:20

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.

`आप` महाराष्ट्रात कोणाला करणार गप्प?

Last Updated: Monday, December 30, 2013, 15:52

दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे.

आजारी असल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली दांडी!

Last Updated: Monday, December 30, 2013, 11:51

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.

पाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा

Last Updated: Thursday, December 26, 2013, 08:22

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.

शांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 08:06

मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.

२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:55

सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.

वाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:27

बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.

पाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:21

सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

पाण्यावर चालणारी `टकसोन एसयूव्ही` लवकरच बाजारात!

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:27

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून कधीन कधी, आपल्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार नक्कीच आला असेल की पाण्यावर चालणारी कार असती तर...! ही कल्पनाही आता प्रत्यक्षात येणार असं दिसतंय.

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

Last Updated: Thursday, November 21, 2013, 20:03

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

Last Updated: Monday, November 4, 2013, 14:55

गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

Last Updated: Friday, October 18, 2013, 14:03

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:31

कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

... इथे येते देवाची प्रचिती!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 21:31

देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय...

धरणं भरलेली; तरीही पुण्याला एकवेळ पाणी…

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 20:37

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

पाण्यासाठी संगमनेर, निफाडच्या ग्रामस्थांचं आंदोलन!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 10:45

दारणासह गंगापूर धरण तुडूंब भरलं असून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी ओसंडून वाहत असताना गोदावरीचे डावा आणि उजवा कालवा बंद करण्यात आलेत.

चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 16:10

जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 16:24

जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.

अटक केल्यास अन्न-पाणी सोडील- आसाराम बापू

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:51

माझ्यासोबत दबरदस्ती केली गेली तर, अन्न-पाण्याचा त्याग करील, अशी धमकी आसाराम बापूंनी दिलीय. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू सध्या अटकेच्या गर्तेत अडकलेत.

गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय

Last Updated: Saturday, August 24, 2013, 18:13

मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आजा गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:22

नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 20:41

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

साचलेल्या पाण्याला रहिवासीच जबाबदार!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 20:45

इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यास त्यासाठी रहिवाशांना जबाबदार ठरवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलाय. पालिकेच्या या निर्णयावर नागपूरकरांनी नाराजी व्यक्त केलीय.

‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:33

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मला फुकटचा पगार नको, अधिकाऱ्याचा राजीनामा

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 16:28

जलसंपदा विभागाच्या गैरकारभाराचा मोठा फटका राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना बसणार आहे. केंद्रीय जल आयोगामध्ये राज्याचा एकमेव प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱ्यांने ३० जूनला राजीनामा दिलाय. कृष्णानंद भट, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

विकेन्ड डेस्टीनेशन : भगीरथ धबधबा

Last Updated: Monday, July 15, 2013, 09:56

पावसाळा सुरु होताच निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलू लागतं. मग सर्वांना वेध लागतात, ते निसर्गनिर्मित्त धबधब्यांचा आनंद लुटण्याचे. अशाच निसर्गप्रेमींना सध्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणीचा भगीरथ धबधबा खुणावतोय.

उजनीचे पाणी अखेर सोलापूरला

Last Updated: Thursday, July 11, 2013, 21:29

पावसाळ्यात का होईना पण सरकारला तहानलेल्या दुष्काळग्रस्त सोलापूरकरांची अखेर आठवण झालीय. सोलापूरकरांसाठी अखेर उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आलंय.

मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी !

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:24

पावसाळ्याला सुरूवात झाली की दुषित पाणीपुरवठा ही मुंबईकरांची नेहमीचीच डोकेदुखी झालीय. मात्र यंदापासून या डोकेदुखीत वाढच झालेली दिसून येतेय. शहरातल्या विविध भागात घेतलेल्या वॉटर सँपल्समधली २६ टक्के सँपल दूषित आढळली आहेत.

विकेन्ड डेस्टीनेशन : आषाणे धबधबा

Last Updated: Monday, July 15, 2013, 10:01

सध्या मुंबईत मस्त पाऊस पडतोय. या पावसाळ्यात भटकण्यासाठी एका छान पर्यटनस्थळाची ओळख करुन देणार आहोत. हा आहे भिवपुरीचा आषाणे धबधबा...

व्हॉट्सअॅपने सोडवला दूषित पाण्याचा प्रश्न!

Last Updated: Monday, July 8, 2013, 18:36

शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉटसअपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.

राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 20:54

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

पाच वर्षे काही न खाता-पिता तो जिवंत!

Last Updated: Sunday, June 30, 2013, 14:23

तुम्ही साधारण किती दिवस उपाशी राहू शकता? एक, दोन, तीन दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस... पण यापेक्षा जास्त दिवस जर माणसानं काही खाल्लं नाही तर त्याची प्रकृती ढासळत जाते.

मुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:50

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा

Last Updated: Monday, June 24, 2013, 07:26

मुंबईतल्या माझगाव, भायखळा परिसरात गेल्या मंगळवारपासून दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. इथल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडं वारंवार तक्रार करुनही कुठलीही दखल घेतलेली नाही.

झेनिथ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 10:07

खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यात दोन पर्यटक बुडालेत. श्रीकांत पवार आणि जयेन्द्र बोराडे अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही बदलापूरचे रहिवासी होते.

नदीजोड प्रकल्पाला सुरूवात

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:40

भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.

परप्रांतीयांना कंत्राट; मनसेची तोडफोड

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 14:15

नागपूर महानगर पालिकेद्वारा संचालित ‘ऑरेंज सिटी वॉटर कंपनी’नं स्थानिकांना डावलून परप्रांतियांना कामाचं कंत्राट दिल्याचा आरोप करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयात तोडफोड केली.

लिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा

Last Updated: Sunday, June 9, 2013, 12:08

शरीरासाठी र्नेसर्गिक आणि उत्साहवर्धक पेय म्हणजे लिंबूपाणी. सदोदित ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले

पाणी वाचवूया... मिशन २४ तास

Last Updated: Friday, July 5, 2013, 16:43

कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणीटंचाई..... आपण बदलू शकतो हे चित्र....

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:53

पावसामुळं या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल. त्यामुळं पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसाची कृपा, सरकारची अवकृपा!

Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03

कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.

पाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 18:10

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 21:33

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 22:05

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:05

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

पाणी आलं आणि ते नाच नाच नाचले...

Last Updated: Monday, April 29, 2013, 08:36

आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.

पुण्यात पाणीबाणी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 14:43

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 20:00

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.

काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेकडून पाण्याची नासाडी

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 22:46

नागपुरात पाण्याची नासाडी केली जातेय. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

केजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार

Last Updated: Saturday, April 6, 2013, 08:27

वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.

`आयपीएल` तुमच्यासाठी कायपण....

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:12

चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय.

IPL : सामान्यांचं पाणी सामन्यांना!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 09:46

महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय.

... जेव्हा नदीलाही लागते आग!

Last Updated: Friday, March 29, 2013, 10:04

पाण्यामध्ये आग लागली... असं आपण कथा-पुराणांमध्ये ऐकलंय. मात्र झारखंडच्या धनबादच्या टर्कीतांड गावातल्या कतरी नदीतल्या पाण्यामध्ये आग लागलीय

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

Last Updated: Saturday, March 23, 2013, 21:36

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे

Last Updated: Saturday, March 23, 2013, 19:49

मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.

भूकंपामुळे पाण्याचं होतंय सोन्यात रूपांतर

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 17:39

भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.

पाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 10:06

भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.

आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी

Last Updated: Monday, March 18, 2013, 11:10

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

Last Updated: Sunday, March 17, 2013, 23:59

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

ऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड

Last Updated: Sunday, March 17, 2013, 17:21

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 13:45

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

पाण्याअभावी... मोरांचा तडफडून मृत्यू!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 09:20

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 12:39

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.