कॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 08:50

वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.

मुंबईसह कोकणात समुद्राला उधाण, भरतीचे पाणी रस्त्यावर

Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:37

मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुुदुर्गात भरतीचा तडाखा बसला.

वजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 15:33

तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता आहे का? तुमचे वजन कमी करायचे आहे. तर मग लिंबू पाणी प्या. रोज सकाळी लिंबू पाणी प्या. या पाण्यामुळे तुम्हाला ताजेतवाणे वाटते. तसेच त्याचे फायदे आहेत.

नळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही

Last Updated: Monday, June 9, 2014, 21:47

आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.

पाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार

Last Updated: Sunday, May 18, 2014, 20:30

मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

कोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 11:33

बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.

... तर नष्ट होईल पृथ्वी?

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 17:49

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

ठाण्यात झोपडीधारकांना बाटली बंद पाणीपुरवठा

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:03

झोपडपट्टीतील लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चक्क बाटली बंद पाणी देण्याचा विचार ठाणे महानगरपालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेने ही जबाबदारी खासगी कंपनीच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय केलाय.

ठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

Last Updated: Friday, May 9, 2014, 17:07

यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.

व्हिडिओ : तिला खूप खूप रडायचंय पण...!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 11:22

ही कहाणी आहे एक मुलीची... आयुष्यात केवळ अपमान आणि धक्क्यांशिवाय तिला काहीच मिळालेलं नाही... खूप खूप मन भरून आलंय... पण, तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला असमर्थ ठरतात...

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय- काकडी!

Last Updated: Monday, May 5, 2014, 17:49

उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

मुंबईकरांनो पाणी काटकसरीनं वापरा

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:26

मुंबईकरांना यंदा पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे, कारण हवामान विभागाने यंदा पर्जन्यमान कमी असल्याचं सांगितलं आहे.

पिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी

Last Updated: Sunday, April 27, 2014, 22:42

पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.

100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:54

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

एटीएम कार्ड स्वाईप करा, पाणी मिळवा!

Last Updated: Monday, March 24, 2014, 12:45

आतापर्यंत आपण पैसे काढाता येणारं एटीएम पाहिलचं आहे. मात्र जर एटीएममधून शुद्ध पाणी मिळाले तर... खरं वाटत नाही ना... मात्र वंदना फाऊंडेशननं मानखुर्दे इथं चक्क शुद्ध पाणी देणारं एटीएम सेंटर सुरु केलंय.

पाणीपट्टी थकविणाऱ्यांत तेंडुलकर अन् ठाकरेही!

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 16:28

कधीही कोणताही कर न थकवणारा अशी ख्याती असलेला भारतातला सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी असलेल्या सचिन तेंडुलकरने पाणीपट्टी मात्र थकवलीय.

आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

मंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 18:35

मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.

ग्लासभर पाण्याने काय होते...

Last Updated: Saturday, January 4, 2014, 13:48

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. पाणी किती प्यावे, कधी प्यावे आदी अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. पण घाबरू नका. तुमच्यासाठी या काही टिप्स...

फेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:01

बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.

दिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट

Last Updated: Monday, December 30, 2013, 18:20

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.

पाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा

Last Updated: Thursday, December 26, 2013, 08:22

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.

शांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 08:06

मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.

२६ लाख खर्च, पारोळा गावातील पाणी योजना शोधून दाखवा?

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:55

सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.

वाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:27

बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.

पाण्याच्या शोधात बिबट्याचा मृत्यू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:21

सातारा येथील खिंडवाडीनजीक पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा पुणे बेळगाव हायवेवर मोठ्या वाहनाची धडक बसल्याने मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी ‘अमर महल’ ठरली धोकादायक!

Last Updated: Monday, December 2, 2013, 11:52

बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

पाण्यावर चालणारी `टकसोन एसयूव्ही` लवकरच बाजारात!

Last Updated: Saturday, November 23, 2013, 18:27

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून कधीन कधी, आपल्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार नक्कीच आला असेल की पाण्यावर चालणारी कार असती तर...! ही कल्पनाही आता प्रत्यक्षात येणार असं दिसतंय.

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

Last Updated: Thursday, November 21, 2013, 20:03

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

असे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 17:24

नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

Last Updated: Monday, November 4, 2013, 14:55

गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.

`लाजवाब` पाणीपुरी... किळसवाणा प्रकार उघड!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 20:48

ठाण्याच्या पाणीपुरी विक्रेत्याचा किळसवाणा प्रताप ‘झी मीडिया’ने यापूर्वी उघडकीस आणला होता. ते प्रकरण अजूनही सर्वसामान्यांच्या स्मरणात असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय.

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

Last Updated: Friday, October 18, 2013, 14:03

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:31

कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

धरणं भरलेली; तरीही पुण्याला एकवेळ पाणी…

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 20:37

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

सिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!

Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58

ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 16:24

जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:39

जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?

गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय

Last Updated: Saturday, August 24, 2013, 18:13

मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आजा गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

पाणीपुरी की `गलिच्छ पुरी`!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 19:01

पाणी पुरी म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र बुलढाणा शहरात पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय.

मनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!

Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:22

नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

मुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:38

पावसाळा त्यात साथीच्या रोगांची लागण, हे समीकरण काही नवं नाही. पण मुंबईकरांनो सध्या सावध राहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. कारण मुंबईत डोळ्यांची साथ सुरू आहे.

पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 20:41

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

साचलेल्या पाण्याला रहिवासीच जबाबदार!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 20:45

इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यास त्यासाठी रहिवाशांना जबाबदार ठरवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलाय. पालिकेच्या या निर्णयावर नागपूरकरांनी नाराजी व्यक्त केलीय.

उजनीचे पाणी अखेर सोलापूरला

Last Updated: Thursday, July 11, 2013, 21:29

पावसाळ्यात का होईना पण सरकारला तहानलेल्या दुष्काळग्रस्त सोलापूरकरांची अखेर आठवण झालीय. सोलापूरकरांसाठी अखेर उजनी धरणाचे पाणी सोडण्यात आलंय.

मुंबईकर पित आहेत, दूषित पाणी !

Last Updated: Thursday, July 11, 2013, 16:24

पावसाळ्याला सुरूवात झाली की दुषित पाणीपुरवठा ही मुंबईकरांची नेहमीचीच डोकेदुखी झालीय. मात्र यंदापासून या डोकेदुखीत वाढच झालेली दिसून येतेय. शहरातल्या विविध भागात घेतलेल्या वॉटर सँपल्समधली २६ टक्के सँपल दूषित आढळली आहेत.

व्हॉट्सअॅपने सोडवला दूषित पाण्याचा प्रश्न!

Last Updated: Monday, July 8, 2013, 18:36

शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉटसअपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.

राज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 20:54

राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.

मुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:50

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

`मुंबई तुडुंब... यात आमची काय चूक!`

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 12:59

पहिल्याच पावसात कोलमडलेल्या मुंबईच्या परिस्थितीचं खापर महापालिका प्रशासनानं हवामान खात्यावर फोडलंय.

मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा

Last Updated: Monday, June 24, 2013, 07:26

मुंबईतल्या माझगाव, भायखळा परिसरात गेल्या मंगळवारपासून दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. इथल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडं वारंवार तक्रार करुनही कुठलीही दखल घेतलेली नाही.

नदीजोड प्रकल्पाला सुरूवात

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:40

भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.

लिंबूपाणी प्या.. सदैव निरोगी राहा

Last Updated: Sunday, June 9, 2013, 12:08

शरीरासाठी र्नेसर्गिक आणि उत्साहवर्धक पेय म्हणजे लिंबूपाणी. सदोदित ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले

पाणी वाचवूया... मिशन २४ तास

Last Updated: Friday, July 5, 2013, 16:43

कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणीटंचाई..... आपण बदलू शकतो हे चित्र....

पंचगंगेमुळे कोल्हापुरकरांचं आरोग्य धोक्यात!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:53

पावसामुळं या नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणात दुषित पाणी पंचगंगा नदीत मिसळेल. त्यामुळं पुन्हा एकदा नदी काठच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसाची कृपा, सरकारची अवकृपा!

Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03

कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.

पाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 18:10

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 22:05

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

खाजगी टँकर्सचालकांकडून नाशिककरांची लूट

Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:05

दुष्काळ आणि मे महिना.... त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढलीय. पण आता खाजगी टँकर्सचालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे. अव्वाच्या सव्वा किमतीनं नाशिकमध्ये पाणी विकलं जातंय.

पाणी आलं आणि ते नाच नाच नाचले...

Last Updated: Monday, April 29, 2013, 08:36

आता बातमी आहे मराठवाड्यातील जनतेला आणि जालनाकरांना दिलासा देणारी. यावर्षी दुष्काळाचा भयंकर सामना करणाऱ्यां नागरिकांना लवकरच पाणीटंचाइपासून मुक्ती मिळणार असल्याची चिन्हं आहेत. या ठिकाणी पाणी सोडण्यात आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करताना रस्त्यावर नाचनाच नाचले.

पुण्यात पाणीबाणी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 14:43

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 20:00

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

केजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार

Last Updated: Saturday, April 6, 2013, 08:27

वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.

IPL : सामान्यांचं पाणी सामन्यांना!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 09:46

महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय.

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

Last Updated: Saturday, March 23, 2013, 21:36

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

भूकंपामुळे पाण्याचं होतंय सोन्यात रूपांतर

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 17:39

भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.

पाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 10:06

भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

Last Updated: Sunday, March 17, 2013, 23:59

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 13:45

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08

नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.

विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 12:39

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.

गोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक?

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 20:49

नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही

मनमाडमध्ये ‘पाणी’बाणी! कडकडीत बंद

Last Updated: Thursday, February 14, 2013, 12:28

मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.

सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:26

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

Last Updated: Sunday, February 10, 2013, 18:45

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

सहकारमंत्र्यांनी ४० गावांचं वीज-पाणी हडपलं...

Last Updated: Friday, January 18, 2013, 16:34

दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

Last Updated: Monday, January 7, 2013, 18:23

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

किळसवाण्या पाणीपुरीवाल्याला चोप

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 23:10

सांगलीत पाणी पुरीवाल्याने किळसवाणा प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुढं आलीय. पाणीपुरीच्या पाण्यात चक्क मुत्र विसर्जन करतानाच नागरिकांनी पाणीपुरी विकणा-याला पकडलंय.

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:03

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

गुडबाय २०१२- पीकपाणी

Last Updated: Monday, December 24, 2012, 23:12

सिंचन घोटाळ्यात श्वेत पत्रिका, काळी पत्रिका आणि सत्य पत्रिका सादर करण्यात आली. मात्र सगळ्याच सत्ताधा-यांनी जबाबदारी झटकत राजकारणात रंग भरले. मात्र सत्ताधा-यांच्या फक्त बैठका आणि चर्चासत्रांचे पीक आलंय. यावर्षी अशा प्रश्न निकालात काढून कृती करण्या ऐवजी वेळ मारुन नेण्याचेच प्रकार या वर्षी दिसून आलेत

भूक लागल्यावर किती खायचे?

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 20:11

आपण कोणता आहार घायचा. किती खायचे. प्रत्येक ऋतुत काय खायचे. आजारी असल्यावर काय आहार असला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. मात्र, यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या पोटाला विचारा! जेवढे खावेसे वाटते तेवढेच खा.

नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:15

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 20:01

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:37

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

`पाणीसंकट टळण्यासाठी औरंगाबाद पालिका बरखास्त करा`

Last Updated: Sunday, November 4, 2012, 00:02

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?

Last Updated: Thursday, November 1, 2012, 23:47

ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.

पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`

Last Updated: Monday, October 29, 2012, 08:08

नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.

भंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी

Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:30

तहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.

गडकरी चोर, पाणी आणि जमीनही चोरली- केजरीवाल

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 17:47

शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल

ही पाहा पाण्यावर चालणारी कार

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 16:56

`द क्वाडस्की` ही कार पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही एक एंफिबियस गाडी असून, ती रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे.