मोदी सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन 4 जूनपासून

Last Updated: Thursday, May 29, 2014, 14:27

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं संसदेतील पहिलं विशेष अधिवेशन हे येत्या ४ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ११ जूनपर्यंत चालेल. ४ आणि ५ जूनला खासदरांचा शपथविधी होईल. तर जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती, संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.

`अवाजवी खर्च नको; भाऊ-पुतण्यांना लांबच ठेवा`

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 19:40

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.

राज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला

Last Updated: Thursday, May 8, 2014, 19:41

डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नागपूरमध्येही धावणार मेट्रो

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 18:27

मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:20

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 13:39

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.

...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका

Last Updated: Thursday, November 29, 2012, 08:01

अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.

आवाज कुणाचा... दादांचा!

Last Updated: Thursday, October 4, 2012, 09:36

मंत्रिमंडळाबाहेर राहून सरकार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा आणि सत्तेबाहेर राहून सत्ता राबवण्याचा हा प्रयत्न

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

Last Updated: Friday, June 22, 2012, 14:36

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.